आष्टी (प्रतिनिधी):-
मराठा समाज आरक्षण प्रकरणी आष्टी तालुक्यात चांगलेच वातावरण तापले आहे.बहुतांश गावात राजकीय पुढाऱ्यांना बंदी केली आहे.आज सकाळी च तहसिलदार यांची गाडी आगीत भस्मसात झाली आहे.आग लावली का लागली अद्याप स्पष्ट झाले नाही अशातच सकल मराठा समाजाच्या वतीने आष्टी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले असून काही कर्मचारी अधिकारी कार्यालयातच अडकले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांना सरकारने दिलेली मुदत संपल्यानंतर पुन्हा जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून आज ६ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आष्टी तालुक्यातील मराठा समाज एकवटला आहे.गावागावात साखळी उपोषण,कॅन्डल मार्च निघत आहेत.आज दि.३० आॅक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता आष्टी तहसिल कार्यालय, पंचायत समिती, रजिस्टर आॅफिस,इरिगेशन, बांधकाम विभाग,पोस्ट आॅफिस,वनविभाग आदीसह शासकीय कार्यालयांना मराठा समाज आंदोलकांनी कुलुप ठोकले असून अधिकारी कर्मचारी कार्यालयातच डांबून ठेवण्यात आले.मराठा समाज आंदोलकांचा तीव्र रोष दिसून आला आहे.सकल मराठा समाज आंदोलक मोठ्या संख्येने आक्रमक झाले होते.