spot_img
spot_img

जयदत्त धस यांच्याकडून अतिवृष्टीच्या पुरामुळे नुकसान ग्रस्त गावाची पाहणी

आष्टी (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील सिना नदीच्या काठावरील साकत, कुंटेफळ (वा.), लोणी, कोयाळ या गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा ओघ वाढल्याने भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीवरील बंधाऱ्यांमधून पाणी ओव्हरफ्लो झाल्याने नदीपात्र फुटून परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कांदा, ऊस, मका व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतांचे रस्ते पूर्णपणे वाहून गेले असून, काही भागांत विहिरी पाण्यात बुजल्या आहे. सोलर पंप व कांद्याच्या चाळी पाण्याखाली गेल्या आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवलेला मुरघासही या पाण्यात मिसळला असून अंदाजे दीडशे ते दोनशे टन मुरघास वाया गेला आहे.

या घटनेची माहिती मिळताच युवा नेते जयदत्त धस यांनी तातडीने प्रशासनाला सोबत घेऊन पूरग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी तहसीलदार मॅडम यांच्याशी संपर्क साधून तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना तातडीने घटनास्थळी पाठवले आणि पंचनाम्याचे काम त्वरित सुरू केले. साकत हे गाव अहिल्यानगर-सोलापूर हायवेपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असून या गावाचा मिरजगाव व अहिल्यानगर शहराशी दळणवळणाचा दैनंदिन संपर्क असतो. मात्र, पुरामुळे रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. याबाबत जयदत्त धस यांनी तातडीने संबंधित विभागाशी संपर्क साधून रस्ता पुनर्बांधणीसाठी आवश्यक कार्यवाहीची विनंती केली आहे.

या पाहणी दरम्यान श्री.उद्धव मोढवे पाटील, श्री.जयसिंग गव्हाणे, श्री.दादा शिंदे, श्री.बाळासाहेब कावरे, सरपंच श्री.सासवडे सर, सरपंच रक्ताटे, श्री. नीलकंठ रक्ताटे, श्री.मयुर मोढवे, श्री.राजु खुरांगे, श्री.दीपक शिंदे,गावातील शेतकरी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!