कडा (प्रतिनिधी) राजकारणात कधीच जाती-पातीचे राजकारण न करता आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेले तसेच मतदार संघाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून विकासाची दुरदृष्टी असलेले नेतृत्व आमदार सुरेश धस यांना भारतीय जनता पार्टीने जनसामान्यांच्या मतांचा आदर करीत योग्य ते स्थान देत नविन मंत्री मंडळात संधी द्यावी अशी मागणी कडा येथील ग्रामपंचायत सदस्य आरिफभाई शेख यांनी केली आहे.
आष्टी, पाटोदा, शिरूर विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील जनतेशी अतिशय घट्ट अशी नाळ जुळली आहे हे कालच्या निकालावरून सिध्द झाले आहे.आघाडी सरकारच्या काळात त्यांनी महसूल व पुनर्वसन खात्याचे राज्य मंत्रीपद सुध्दा भुषविले आहे.आ.सुरेश धस यांनी मंत्रिपदाच्या काळात अतिशय उत्तम असे काम केलेले आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ.सुरेश धस यांनी ७८ हजारांच्या फरकाने दणदणीत विजय संपादन केला आहे.यापुर्वी तीनवेळा विधानसभेचे नेतृत्व केले असून एक वेळा बीड, लातूर, धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेचे आमदार म्हणून काम केलेले आहे.त्यांच्या जवळ आमदारकीचा चार टर्मचा दांडगा अनुभव आहे. त्यांचा जनसंपर्क सुध्दा खूप मोठा असल्याने माजी मंत्री तथा आमदार सुरेश धस यांना कँबीनेट मंत्री करावे अशी मागणी कडा येथील ग्रामपंचायत सदस्य आरिफभाई शेख यांनी केली आहे.