spot_img
spot_img

ॲड रिजवान शेख यांना समाज सेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर, रविवारी मुंबईत होणार मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण सोहळा…

आष्टी (प्रतिनिधी)आष्टी शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲड रिजवान शेख हे गेल्या १० वर्षांपासून सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असून अनेक सामाजिक व विद्यार्थी, युवक,गोरगरीब सर्वसामान्यांच्या, विविध घटकांतील प्रश्न वेळोवेळी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याने त्यांना सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल मुंबई येथील जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाच्या वतीने रविवार दि २३ जून रोजी आयोजित शिवराज्याभिषेकाच्या गौरवशाली दिनानिमित्त महाराष्ट्र स्वाभिमान गौरव समाज सेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश जाधव व सचिव सुरज भोईर यांनी दिली.
मुंबई येथील जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाच्या वतीने शिवराज्याभिषेकाच्या गौरवशाली दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येत असतात. या वर्षीचा २०२४ चा उत्कृष्ट समाज सेवा पुरस्कार ॲड रिजवान शेख यांना जाहिर झाला असून रविवारी मुंबई पत्रकार संघ येथील पत्रकार भवन आझाद मैदानाजवळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.मुंबई येथील जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाच्या वतीने धार्मिक, सामाजिक, साहित्य,कला,क्रीडा,पञकारित, कृषी व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र स्वाभिमान गौरव राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
यावर्षी सामाजिक कार्यकर्ते ॲड रिजवान शेख यांना समाज सेवा राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!