spot_img
spot_img

सर्व सामान्यांसाठी लढणारे वाघासारखे स्वाभिमानी लोकप्रतिनिधी निवडून द्या – खासदार डॉ. अमोल कोल्हे

पाथर्डी (प्रतिनिधी) :- दिल्लीच्या इशाऱ्या वर माना हलवणारे नंदीबैल निवडून देण्यापेक्षा सर्वसामान्यांसाठी लढणारे वाघा सारखे लोकप्रतिनिधी निवडून द्या. आपली अर्थव्यवस्था ही जगात पाचव्या स्थानावर असल्याचे सांगितले जाते. परंतु देशातील नव्वद टक्के संपत्ती ही दहा टक्के लोकांच्या हातात आहे. आणि हे देशातील सर्व सामान्यांसाठी घातक आहे. तुमच्या मनात प्रताप ढाकणे हे आमदार व्हावे अशी इच्छा असून ती पूर्ण होणार आहे. आज देशात केवळ रंगाची भाषा वापरली जात असून पोटातल्या भुकेला जात व धर्म नसतो हे त्यांना कळेनासे झाले आहे. परीवर्तनाची लढाई लढावी लागेल त्यासाठी युवकांनी तयार रहावे असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी शेवगाव व पाथर्डी तालुक्यात सुरु केलेल्या युवा संपर्क अभियानाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ऋषीकेश ढाकणे, शिवशंकर राजळे, गहीनीनाथ शिरसाट, बंडु पाटील बोरुडे, शिवसेनेचे भगवान दराडे, विष्णु ढाकणे, आजीनाथ खेडकर, दिपक देशमुख,
विष्णु थोरात, महारुद्र किर्तने, देवा पवार, अमोल पालवे, चंद्रकांत भापकर, माधवराव काटे, प्रभावती ढाकणे, रामराव चव्हाण , राजु नागरे, दिंगबर गाडे, सिताराम बोरुडे, वैभव दहीफळे, बाळासाहेब ढाकणे, पप्पु
शिरसाट, सुधाकर सानप, माऊली केळगंद्रे, डॉ. राजेंद्र खेडकर, उद्धव दुसुंग,सिद्धेश ढाकणे, प्रकाश दहिफळे, वैभव दहिफळे, महादेव दहिफळे, योगेश रासने, देवा पवार हे उपस्थित होते. या वेळी “वाटचाल भविष्याची” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना कोल्हे म्हणाले की,
उसतोडणी कामगार व वंचितांसाठी आपले आयुष्य वेचण्याचे काम स्व.गोपीनाथ मुंडे यांनी केल्याने पाथर्डी तालुक्यात आलो की त्यांची आठवण आल्या शिवाय राहात नाही. स्व. बबनरावजी ढाकणे यांनी युवा अवस्थेत तालुक्यात वीज आणण्यासाठी विधानसभेत पत्रके फेकली अन काळाच्या ओघात जनतेच्या पाठबळावर ते देशाचे ऊर्जामंत्री झाले हा प्रवास युवकांसाठी प्रेरणादायी आहे.
आज शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत चर्चा करा अशी मागणी आम्ही केली तर सुप्रियाताई सुळे व माझ्यावर निलंबनाची कारवाई केली. अंधभक्तांच्या टोळी पासून आता आपल्याला वाचवायचे असल्याने नवमतदारांनी विचारपूर्वक मतदान करायला हवे. टाटा एअरबस, वेदांता फॉक्सन सारखे राज्यातील मोठमोठे प्रकल्प गुजरातला नेण्यात आले. या विषयावर सत्ताधारी खासदार बोलत नाही. बेरोजगारी, महागाई यावर कुणी बोलायला तयार नाही. कोट्यवधी रुपयांचे रस्ते, पूल, राममंदिर उभारले याचा आम्हालाही अभिमान आहे. पण यावर चालणारा व मंदिरात जाणारा सर्व सामान्य माणूस सुद्धा जगला पाहिजे याचा विचार सरकार करत नसून जाती धर्माच्या नावाखाली जनतेला वेढण्याचे काम यांनी सुरु केले आहे. विरोधात कोणी बोलले तर ईडी व सीडी चा वापर केला जातोय मात्र या सर्वा विरुद्ध ८३ वर्षाचे तरुण नेते शरद पवार योद्धा बनुन लढत आहे. जे लढतात त्यांचाच इतिहास लिहिला जात असल्याने तरुणांनी लढण्याचे काम करावे. संघर्ष योद्धा बबनरावजी ढाकणे केदारेश्वरचे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीकेश ढाकणे यांनी स्वागत केले. गणेश सरोदे व अपर्णा शेळगावकर यांनी सुत्रसंचालन केले. आभार माधव काटे यांनी आभार मानले.
➡️- कोणी डंका वाजवा अथवा कोणी झेंडा रोवा मी मैदानात उभा आहे. आता कोणीही येवुद्या मी दंड थोपटुन तयार आहे. आता कुस्ती करावीच लागेल व जिंकांवी लागेल असा टोला व राजळे व घुले यांचे नाव न घेता अँड.
प्रतापराव ढाकणे यांनी लगावला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी व युवक उध्वस्त झाला आहे. शेतीमालाला भाव नाही. हाताला रोजगार नाही. शेतीला पाणी नाही. कर्जाच्या ओझ्याखाली माणस दबली आहेत. समाजमन व समाज भावना समजुन घेणारा कार्यकर्ता तयार झाला पाहीजे. आजची जी अराजकता आहे त्याला शासन व्यवस्था जबाबदार आहे. मी रडणारा कार्यकर्ता व
नेता नाही मला लढण्याचा संर्घषाचा वारसा मिळालेला आहे. मी लढेल व जिंकेल
असा विश्वास प्रतापराव ढाकणे यांनी व्यक्त केला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!