spot_img
spot_img

गुणवंत विद्यार्थी मराठा समाजाचे भूषण – बापूसाहेब डोके

कडा (प्रतिनिधी) :- अहमदनगर जिल्हा मराठा समाज सेवा मंडळ ही संस्था समाजसेवेसाठी कटिबद्ध असून त्या दिशेने कार्य सुरु आहे. समाजाची शिक्षणातून प्रगती साधली जाणार आहे. कुणबी प्रमाणपत्राचा पुरेपूर फायदा गुणवंत विद्यार्थ्यांनी घ्यावा. ध्येयनिश्‍चित करा ते प्राप्त करण्यासाठी सातत्याने वाटचाल करण्याचे व तंत्रज्ञान क्षेत्राकडे वळण्याचे आवाहन मराठा समाज सेवा मंडळाचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे चिटणीस बापुसाहेब डोके यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना केले.
अहमदनगर जिल्हा मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९३ टक्कयांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या ३९ गुणवंतांना रोख ५ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याप्रसंगी बापूसाहेब डोके बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, उपाध्यक्ष बाबासाहेब गिरवले, सहसचिव बाळकृष्ण काळे, खजिनदार विनायकराव गरड,सचिव अनिल शिंदे,विश्‍वस्त जयंत वाघ, रमाकांत गाडे उपस्थित होते.
पुढे बोलताना बापूसाहेब डोके यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मुले-मुली विशेष गुण प्राप्त करून पुढे येत आहे. यामध्ये मुलींची संख्या अधिक आहे. पालक व शिक्षक त्यांना वळण देऊन योग्य मार्ग दाखविण्याचे काम करत आहेत. संस्थेचे सचिव अनिल शिंदे यांनी सांगितले की, समाज सेवा मंडळ समाजातील होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठिशी उभे आहे. संस्थेच्या वतीने सातत्याने गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. गुणवंत विद्यार्थी समाजाचे भूषण असून, त्यांना दिशा देण्याचे काम केले जाते. मागील चार वर्षापासून सातत्याने मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जात आहे. पहिल्या वर्षी २ नंतर ३ आणि यावर्षी ५ हजार रुपये प्रत्येकी गुणवंतांना देण्यात आले आहे. पुढील वर्षापासून प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांना ११ हजार रुपये देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात सहसचिव बाळकृष्ण काळे यांनी केले.
त्यांनी सांगितले की,समाजाला दिशा व आधार देण्याच्या उद्देशाने १९७५ साली या सेवा मंडळाची स्थापना करण्यात आली. पुढील वर्षी गुणवंतांना प्रत्येकी ११ हजार रुपये बक्षीस देण्यासाठी रमाकांत गाडे यांनी १ लाख १ हजार, बापूसाहेब डोके व अनिल शिंदे यांनी प्रत्येकी ५१ हजार रुपये देण्याचे जाहीर केले
उपस्थितांचे आभार जयंत वाघ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत कदम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास पालक व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!