आष्टी (प्रतिनिधी) तरुणांनी नोकरीपेक्षा कौशल्य रोजगार उद्योजकता विकास उपक्रमांचा अभ्यास करून व्यवसाय सुरू करावेत असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आष्टी येथील श्री गुरुलिंग स्वामी जिबकाटे शासकीय तंत्रनिकेतन येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करताना प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी रा.स्व. संघाचे जेष्ठ कार्यकर्ते श्रीधर सहस्त्रबुद्धे, रा.स्व. तालुका संघचालक कैलास रेडेकर प्राचार्य गणेश हडतगुणे उपस्थित होते या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडीओद्वारे करण्यात आले. तसेच, मा. श्रीमती मनीषा वर्मा (अप्पर मुख्य सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग) यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा संदेश पाठवून उपस्थितांचे उत्साहवर्धन केले.
आ. सुरेश धस पुढे म्हणाले, बेरोजगारीच्या समस्येवर कौशल्य शिक्षण हाच उपाय असल्याचा प्रभावी संदेश दिला. त्यांनी युवकांना व्यवसायाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहनही यावेळी केले. शिवराज्याभिषेक दिन फक्त साजरा न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गुण युवकांनी आपल्या अंगी उतरवावेत प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार करावेत सार्वजनिक संपत्तीचे व पर्यावरणाचे रक्षण करावे शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली व प्रागतिक राज्य उभे केले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली स्वतःची अशी युद्धनीती विकसित केली जी गनिमी कावा म्हणून ओळखले जाते
कार्यक्रमात कुमारी शिवकन्या सौंदनकर हिने आपल्या ऑन-जॉब ट्रेनिंगचा अनुभव शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. श्री प्रबोधन निकाळजे यांनी सोशल मीडियापासून दूर राहून युवकांनी कौशल्य शिक्षणाकडे लक्ष देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री श्रीधरपंत सहस्त्रबुद्धे यांनी शिवराज्याभिषेकाचा इतिहास सांगत त्याचा सण म्हणून महत्त्व विशद केले. त्यांच्या मनोगताच्या शेवटी त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी तंत्र प्रदर्शनाला भेट देत प्रशिक्षणार्थ्यानी तयार केलेल्या विविध प्रकल्पांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयटीआयचे प्राचार्य श्री गणेश हडतगुणे यांनी केले तर सूत्रसंचालन एम. जी. पवार सर यांनी प्रभावीपणे पार पाडले.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये नगराध्यक्ष जिया बेग नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष श्री रंगनाथ धोंडे, श्री अशोक जीबकाटे, अॅड. प्रबोधन निकाळजे, श्री अक्षय शिरस्वाल, श्री कैलास रेडेकर, श्री गणेश शिंदे, श्री गौतम आजबे, श्री विनोद रोडे,श्री सुनिल सानप, श्री नितेश कर्डुले, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.