spot_img
spot_img

कविवर्य बाळासाहेब कोठुळे यांची कवी संमेलनाचे अध्यक्षपदी निवड

पाथर्डी (प्रतिनिधी) :- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे दिनांक १ जून रोजी होणाऱ्या संत ज्ञानेश्वर एक दिवसीय साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पाथर्डी तालुक्यातील जेष्ठ कवी व द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाळासाहेब कोठुळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची अधिकृत माहिती लोककला, कलावंत साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पवार यांनी पत्राद्वारे कळवली आहे.
संत साहित्य संमेलनामध्ये होणाऱ्या कवी संमेलनासाठी महाराष्ट्रातील लोकप्रिय व दर्जेदार कवींचा समावेश होणार आहे. काव्य संमेलनामध्ये सर्वच विषयाला स्पर्श करून जाणाऱ्या रचनांचे सादरीकरण होणार असून कवितेला विषयाचे बंधन नाही .या संमेलनामध्ये भास्कर दादा लगड, रूपचंद शिदोरे, आत्माराम शेवाळे , राजेंद्र उदारे, संजय माकोणे, सुरेश वैरागर , डॉक्टर बेनझीर शेख, शाहीर भारत गाडेकर, ज्ञानदेव ऊडे, सुनिता वाळुंज, आबासाहेब शिरसाठ, रावसाहेब मते, सीमा राणी बागुल, संजय आहेर, अश्विनी म्हात्रे, निवृत्ती महाराज कानडे, वाघमारे, गोरख पवार, मगनलाल बागमार, देवा थोरात, कविता आढागळे, बबनराव आढाव, बाळासाहेब मनतोडे, गोविंद पाठक, सचिन शेरकर, प्रदीप बोडखे, एकनाथ डांगे, महेश कुलकर्णी, रसाळ मॅडम, अरविंद सग भोर, विलास गबाले, सोमेश कुलकर्णी, अण्णासाहेब मोहन, संदीप कदम, राजेंद्र थोरात, संगीता फासाटे, नवनाथ कुताळ, लेविन भोसले, दिलीप पवार, ओवी काळे, शितल निंभोरे, गणेश सोनवणे, दीपक तर कासे, राजेंद्र शिरसाट, लक्ष्मण कोल्हे, गीता श्री नाईक, आबासाहेब उमाप, रमेश गुंड, नवनाथ ढाकणे, इत्यादी कवी सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कविवर्य बाळासाहेब कोठुळे हे 1990 सालापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. चारोळ्या, वात्रटिका, प्रेम काव्य, विडंबन, सामाजिक व राजकीय, निसर्ग अशा सर्व विषयांना स्पर्श करून जाणार त्यांचं लिखाण वास्तववादी असते. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक काव्य संमेलना मधून त्यांच्या कवितेचा सहज प्रवास पाहायला मिळतो. विचार करायला आणि अंतर्गत व्हायला लावणारी त्यांची कविता रसिक प्रेक्षकांना भुरळ घालते. पत्रकारिता आणि निवेदन करणे हा त्यांचा आवडता छंद आहे. त्यांच्या या व्यासंगामुळे त्यांना साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्य, निवेदन, पत्रकारिता, कृषी क्षेत्र याकरता ६३ राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना आतापर्यंत प्राप्त झाले आहेत.
सामाजिक जीवनात काम करत असताना राष्ट्रीय सेवा योजना , प्रौढ शिक्षण, निरंतर शिक्षण, स्वयंअध्ययन, वृक्षारोपण व संवर्धन, व्यसनमुक्ती व चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन अशा सामाजिक उपक्रमांमधून त्यांचे उल्लेखनीय आणि कौतुकास्पद कार्य आहे. आदित्य सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यामधून त्यांनी आरोग्य शिबिराचे मोठे कॅम्प घेऊन जवळजवळ 1000 रुग्णावरती मोफत शस्त्रक्रिया करण्याचे कार्य केले आहे.
अनेक संघटनेच्या पदावरती त्यांनी यशस्वीपणे काम सांभाळले आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या तालुका कार्यकारणी मध्ये त्यांनी काम केले आहे तसेच माहिती अधिकार कायदा या चळवळीमध्ये त्यांनी कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे व स्वाभिमानी मराठा महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी काम केले आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या निवारण करण्याकरता द युवा ग्रामीण पत्रकार संघ कार्यरत आहे या संघटनेच्या महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी सध्या ते कार्यरत आहेत तसेच एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या अहिल्या नगर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. शब्दगंध साहित्य परिषदेचे पाथर्डी तालुका प्रसिद्धीप्रमुख म्हणून ते काम करत आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कमिटी वरती त्यांनी पाच वर्ष यशस्वी कामकाज केले आहे.त्यामुळे त्यांचा महाराष्ट्र मध्ये मोठा जनसंपर्क असल्यामुळे लोककला, कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने त्यांच्यावरती या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. या निवडी बद्दल एकताचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड सर, शब्दगंधाचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, शब्दगंधाचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, चितळी गावचे सरपंच अशोक आमटे, मुख्याध्यापक बाळासाहेब ताठे, चितळी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब ताठे, वृद्धेश्वर चे ज्येष्ठ संचालक सुभाष ताठे, राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजधर टेमकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!