पाथर्डी(प्रतिनिधी) श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेचा अखेरचा टप्पा फुलोर बाग यात्रा व नीशान भेट कार्यक्रम लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सायंकाळच्या सुमारास नाथांची पालखी, पंचधातूचा घोडा व कावडी बरोबर आलेले मानाचे ध्वज म्हणजे निशान यांची भेट गावातील लक्ष्मी माता मंदिर परिसरात झाली. हा सोहळा खूप प्रेक्षणीय असतो. तेलंगणा राज्यातील बंजारा समाजातील भाविक देवाच्या स्वागताला या ठिकाणी येऊन मिरवणुकी पुढे बंजारा नृत्य करत आपली सेवा रुजू करतात. मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेची सांगता गुढीपाडव्याच्या महापूजेने होते फाल्गुनी अमावस्या हा नाथांचा प्रकट दिन समजला जातो या दिवशी संपूर्ण परिसर वृक्षवेली त्याकाळी प्रभावित होऊन दवणा वनस्पती विविध फुले पानांनी निसर्ग बहरला चैत्रपाल विने नाथांचे स्वागत केले सुगंधाची दरवळ सर्वत्र पसरली सर्वसृष्टीला नवा फुलोराला म्हणून यात्रेच्या या टप्प्याला फुलोर बागयात्रा म्हणतात पैठण येथून आलेल्या कावडीने नाथांच्या समाधीस जलाभिषेक केला उत्तर भारतातून दक्षिणेकडे भ्रमंती करताना नाथांनी ज्या ठिकाणी काही काळ विश्रांती घेतली ते ठिकाण मढी निवडून घे गावाच्या सेवेवर असून तेथे यात्रा भरते छत्रपती शाहू महाराजांनी गडाचे काम पूर्ण केल्यावर फाल्गुनी अमावस्येला पैठणचे वेदशास्त्र संपन्न पंडित गंगाधर पंत दीक्षित यांच्या हस्ते नाथांच्या समाधीला गंगाजल आणि अभिषेक केला गुढीपाडव्याच्या पहाटे होम हवन व अन्य धार्मिक विधी करत छत्रपतींच्या परंपरेनुसार नगारा वाद्य वाजवत पूजा विधी आधी प्रथा सुरू केल्या दुपारनंतर गडावरून नाथांची पालखी पंचधातूचा घोडा अशी मिरवणूक वाजत गाजत निघाली भेटीच्या स्थळी निवडूंगे येथून वाजत गाजत आलेले निशाण यांची भेट झाली मढी पैठण सावरगाव मिरी येथील स्वतंत्र निशान तर निवडुंगे अंतराळ साकेगाव बाबुळगाव कासार पिंपळगाव दुसरे यांचे मिळून एक असे निशाण मानाचे समजले जाते या सर्व निशाण ध्वजाच्या काठ्या एकत्रित बांधून पोलीस दलाकडून त्या ताब्यात घेतल्या जातात व त्यांचेमार्फतच देवाच्या पालखीला असा स्पर्श होतो त्यानंतर मिरवणूक यात्रा सुरू होते कावड मिरवणूक दरम्यान लहान मुलांना कावडीच्या मार्गावर झोपवले जाते त्यांना ओलांडून कावडीवाले पुढे जातात यामुळे देवाची कृपा होऊन नकारात्मक शक्तीची बाधा मुलांना होत नाही अशी श्रद्धा भाविकांची आहे कावडीच्या स्नानानंतर सुगंधी उठणे विधी सुरू होऊन त्यानंतर महापूजा होते आज पहाटेपासूनच संपूर्ण परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून वारंवार वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक झाली भाविकांच्या मोठ्या संख्येपुढे एसटी महामंडळाचे नियोजन अत्यंत कमी पडले पाथर्डी तिसगाव धामणगाव मढी घाटशिरस मायंबा घाट असा संपूर्ण २५ किलोमीटरचा परिसर वाहतूक कोंडीत हरवला आज उन्हाची तीव्रता प्रचंड असूनही भाविकांचा उत्साह कोठेही कमी नव्हता श्रेणी अमावस्या त्याला जोडून आलेली सुट्टी शालेय सुट्ट्यांचा हंगाम यामुळे जिल्ह्यात येणारे भाविक मढी मायंबा शनिशिंगणापूर मोहटादेवी वृद्धेश्वर असे सर्वत्र फिरले. त्यातच आज शनी ग्रहाचा पालट होऊन तो पर्वकाळ सायंकाळी असल्याने दिवसभर लाखो भाविकांनी भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतला नाशिक व अहिल्यानगरच्या भाविकांनी यंदा कुंभमेळ्या होऊन आणलेले त्रिवेणी संगमावरील पवित्र जल जलाभिषेकासाठी मढी व मायंबा येथील समाधी स्थळावर वापरले. संपूर्ण परिसर नाथांच्या जयजयकार आणि दुमदुमला पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची यात्रेत सर्वाधिक विक्री झाली मढी ग्रामपंचायत देवस्थान समिती व स्थानिक प्रशासनाने यात्रेचे चांगले नियोजन केले. ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच संजय मरकड ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे तर देवस्थान समितीच्या वतीने विश्वस्त मंडळातील बबन मरकड, , रवींद्र आरोळे, शामराव मरकड, नवनाथ मरकड माजी सरपंच देविदास मरकड, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मरकड आदींनी मान्यवरांचे स्वागत करत विविध उपक्रमांचे संयोजन केले.