spot_img
spot_img

नवसाला पावणारी देवळाली येथील मेंढवाडीची देवी,हजारो भाविकांचे श्रद्धास्थान

देवळाली प्रतिनिधी अतुल जवणे :-

आष्टी तालुक्यातील देवळाली गावाचे आराध्य दैवत असलेल्या मेंढवाडी देवीच्या नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेने मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. नवरात्र उत्साहात तरुणांचा सहभाग विशेष असतो तुळजापुर ते देवळाली अशी पायी दिंडी तरुणाई काढते आणि येताना तुळजापुर येथिल तुळजा भवानीच्या मंदिरापासुन पेटती ज्योत घेवुन तरुण अनवाणी पायी येतात ती ज्योत गावात आणल्यावर वाजत गाजत मेंढवाडी देवीच्या मंदिरापर्यंत आणतात नऊ दिवस येथे विविध कार्यक्रमअसतात भाविकभक्तांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. मंदिरावर आकर्षक रोषणाई केली असुन मंदिर गाभाऱ्यात पान फुलांची सजावट केली आहे मेंढवाडीची देवीचे मंदिर हे देवळाली गावाच्या आग्नेय दिशेस असलेल्या डोंगरावर आहे श्री जगदंबा मातेचे मंदिर हे खुप विलोभनिय असुन तुळजापुर देवीचे एक शक्तीपीठ आहे, भक्ताच्या नवसाला पावणारी आणि इच्छापूर्ति करणारी श्री जगदंबा माता एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते, मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या दोन सुंदर मुर्ती आहेत एक तुळजापुरची देवी तर दुसरी मेंढवाडी देवी असे एकत्र असलेले देवीचे मंदिर महाराष्ट्रात एकमेव आहे. देवीच्या मंदिराची भव्यदिव्य बांधकाम हे लोकवर्गनीतुन करण्यात आले आहे. मंदिरपरिसरामध्ये एक मोठी उंच अशी दीपमाळ आहे, व यज्ञकुंड आहे. घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना होऊन,अष्टमीला मोठा यज्ञ सुरू होऊन नवमीला पुर्णाआहूती होते. नवरात्रीच्या कालावधीत आपण केलेला नवस फेडण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त मोठया संख्येने या ठिकाणी येतात.दसऱ्याच्या दिवशी देवीच्या पालखीची मिरवणूक वाजत गाजत गावातुन काढून मंदिरापर्यंत आणली जाते, तेथे आल्यानंतर देवी भक्ताच्या अंगावर झेप घेते, हा अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थीत असतात व नंतर देवीला पालखीत घालून वाजत गाजत सीमोलंघनासाठी माळरानावर एक किलोमीटर पर्यंत सीमोलंघनासाठी नेले जाते व तेथे गेल्यावर देवीची आरती करून परत आल्यावर मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा वाजत गाजत होतात नंतर देवी पलंगावर ठेवली जाते पाचव्या दिवशी म्हणजे आश्विन शु. पौर्णिमेला (कोजागिरी पौर्णिमेला) देवीची मोठी यात्रा भरते महाराष्ट्रातील भक्त मंडळी देवीच्या दर्शनासाठी मोठया संख्येने येतात या दिवशी, पैठण व नागतळा येथून कावडीने आणलेल्या पाण्याने देवीचा अभिषेक केला जातो, हा उत्सव घटस्थापनेपासुन कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालतो. यात्रेनंतर या सर्व कार्यक्रमाची सांगता होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!