spot_img
spot_img

वटपौर्णिमा का साजरी केली जाते,काय आहे या सणाचं महत्त्व :

बीड (प्रतिनिधी)वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचं फार महत्त्व असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं आजच्या या वटपौर्णिमा साजरं करण्यामागचं कारण काय आहे किंवा या सणाचं महत्त्व काय, याबाबत जाणून घेऊयात.
 आज वट सावित्री पौर्णिमा असल्यानं आजच्या दिवशी विवाहित महिला सोळा शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात, भारतात वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा ही अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला आणि त्याचा पूजेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं मानलं जातं. सावित्रीने पती सत्यवानला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली होती, त्यामुळं यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला सत्यवान परत दिला, असं या सणाबाबत सांगितलं जातं
➡️ पतीच्या दिर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत
आजच्या या सणाच्या दिवशी महिला वटपौर्णिमेचं व्रत करतात. त्यासाठी झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून त्याला सात परिक्रमा घालतात, या प्रक्रियेदरम्यान महिला या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करत असतात
➡️ वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचं महत्त्व काय?
हिंदू धर्मातीत धार्मिक मान्यतांमध्ये वडाच्या झाडाचं फार महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. वड हे त्रिमूर्तीचे, सालात विष्णूचे, मुळात ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिवाचे प्रतीक असल्याचं मानलं जातं. वड हे दीर्घकाळ अक्षय राहत असल्यानं त्याला अक्षयवत असंही म्हटलं जातं. भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करायचे, याशिवाय वडाचं झाड औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतं.वडाचे झाड सर्वात जास्त ऑक्सीजन सोडतो हवा शुद्ध ठेवण्याचे कामही वडाचे झाड करते त्यामुळं वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचं अनन्यसाधारण महत्त्व शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेलं आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!