आष्टी ( प्रतिनिधी):-कुणाकडे खूप कपडे, बुट आणि दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत, तर कुणाकडे यापैकी काहीच नाही. समाजात ही दरी दिवसेंदिवस वाढतच जात आहे. हीच दरी कमी करण्यासाठी मोठा आधार ठरणारी ‘माणुसकीची भिंत’ आता आष्टी पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या संकल्पनेतून नको असेल ते द्या,हवे असेल ते घेऊन जा हे ब्रीद वाक्य घेऊन उभारली गेल्याने गरजूंना मदत मिळू शकणार आहे.नावाप्रमाणेच ही भिंत माणसातली माणूसकी दाखवून देत आहे.जे नको आहे.असे कपडे देण्यासाठी नागरीकांची रीघ लागली आहे.मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
माणुसकीची भिंत’ ‘नको असेल ते द्या व हवे असेल ते घेऊन जा’, यावर आधारलेली ही भिंत गरीब, मध्यमवर्गीय, सर्वांसाठीच आकर्षक ठरली आहे. आष्टी पोलीस ठाण्यात ही भिंत उभारण्यात आली आहे. हि भिंत माणुसकीची भिंत म्हणून सजविण्यात आली आहे.इतर साहित्य, पुरुषांचे साहित्य, महिलांचे साहित्य, लहान मुलांचे साहित्य अशा विभागांमध्ये साहित्य ठेवावे, अशा सूचना यामध्ये करण्यात आल्या आहेत. ‘एक हात मदतीचा एक हात माणुसकीचा’, असे आवाहन याद्वारे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. चालू केलेल्या या उपक्रमांतून गरजूवंत हवे आहे त्या वस्तू घेऊन जात आहे.विशेष म्हणजे कोणावरही स्वच्छ कपडे आणून देण्याचे बंधन टाकण्यात आले नसून मळलेले कपडेदेखील स्वीकारले जात आहेत.शहरात सध्या थंडी वाढत असल्याने ही भिंत अनेक गरजूंसाठी खऱ्या अर्थाने माणुसकीची ठरणार आहे.या माणुसकीच्या भिंतीचा उपक्रम दि.३० डिसेंबर रोजी सकाळी पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळ यांनी सुरू केला असून यावेळी पोलीस उपनिरीक्षक नामदेव धनवडे, पो.ह.अशोक शिंदे ,बब्रुवाण वाणी, श्रीगणेश राऊत, तांबे मेजर,बाबुशा काळे,आदी कर्मचारी हजर होते.माणुसकीची भिंत आष्टी पोलिसांचे वेगळेपण दर्शविण्यातही महत्त्वाची ठरत आहे.
➡️ गोरगरीबांना आधार देणारा उपक्रम भरभरून सहकार्य करावे
कुकडणा-या थंडीत गरीबांना उबदार कपडे घालण्यासाठी नाहीत असा पण घटक समाजात आहे. अनेक जण थंडीने कुडकुडणारी लहान मुले, पुरुष,महिला पाहिल्या. त्यावेळी त्यांच्यासाठी काहीतरी करावे, हा विचार मनात आला आपण सहज म्हणतो आताच्या जमाण्यात माणूसकी संपली, पण लोक गरजूंना मदतीसाठी पुढे येण्यास उत्सुक असतात हे माणुसकीची भिंत हे उत्तम उदाहरण आहे. ज्यांना कपडे,उबदार वस्तू यांची गरज आहे.त्यांनी घेऊन जावे तसेच दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात मदत करावी कालपासून लोकांनी मदत म्हणून दिलेले कपडे गरजूं लोक घेऊन जात आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान होते. त्यामुळे हे सामाजिक काम असेच पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
– संतोष खेतमाळस ( पोलिस निरीक्षक,आष्टी )