spot_img
spot_img

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे शेतकरी कृषी प्रशिक्षण

कडा (प्रतिनिधी) :- पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा अधिकचा कसा फायदा होईल या उदात्त हेतूने एल & टी टेक्नोलॉजी सर्व्हिसेस आणि वनराई यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक ग्राम विकास प्रकल्पांतर्गत सतत प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे एल टी टेक्नॉंलॉजी सर्व्हिसेस आणि वनराई च्या विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शेरी बु./ खाकाळवाडी येथे एकदिवशीय शेतकरी कृषी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षतेखाली प्रगतशील शेतकरी मा.श्री.दत्तात्रय सोनावणे यांनी भूषविले त्यानंतर श्री ज्ञानेश्वर सरडे (प्रकल्प समन्वयक वनराई) यांनी या कृषी प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.सुनिल पानखडे.(प्राचार्य, डॉ.अण्णासाहेब कृषी तंत्र विद्याल आदिनाथनगर, पाथर्डी) यांनी खरबूज पिकाची लागवड व नियोजन या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामध्ये त्यांनी जमिनीची निवड, पूर्व मशागत, पिकाच्या वाणाची निवड, लागवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तन व्यवस्थापन, रोग व कीड व्यवस्थापन, काढणी व बाजारपेठ या मुद्यावर अनुभवातून आलेली व वैज्ञानिक गोष्टीसह सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली आणि पिक लागवडीकरिता वापरण्यात येणारे तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घातल्यामुळे एक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येते. यामध्ये संरक्षित शेतीचा विचार केला तर यामध्ये शेडनेट आणि पॉलिहाऊस, मल्चिंग या तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे आहे. जर मल्चिंग तंत्रज्ञान पाहिले तर यामध्ये नियंत्रित तापमानाचा वापर करून वर्षभर पिकांची लागवड करून भरपूर उत्पादन घेऊ शकतो. तसेच कीड व रोग यापासून देखील प्रभावी संरक्षण आपल्याला करता येते. या पिकाला पाण्याची व्यवस्थापन करताना खूप काळजी घ्यावी लागते. या पिकाला जास्त पाणी चालत नसल्यामुळे ठिबक सिंचन पद्धतीचा वापर हा महत्त्वाचा ठरतो. ठिबक संचाची निवड करताना चार लिटर प्रतितास क्षमता असणारी ड्रीप लाइन याकरिता निवडणे गरजेचे आहे. वातावरण तर ढगाळ असेल तर खूप कमी पाणी लागते.परंतु फळधारणा आणि फळ फुगवणीच्या वेळेमध्ये खूप पाण्याची आवश्यकता असते. साधारणपणे दोन ते तीन लिटर पाणी प्रती झाड प्रत्येक दिवशी असे नियोजन करणे गरजेचे आहे. *प्रगत शेतकरी राहुल गोरे* यांनी गुलाब पिकांची लागवड कशी करावी या संदर्भात माहिती विचारले असता प्रा. पानखडे यांनी सांगितले की, बाजारात बाराही महिने गुलाबाची मोठी मागणी असते. प्रत्येक लग्नसमारंभ असो किंवा वाढदिवस,सभा, गणपती सणवार अशा अनेक कार्यक्रमासाठी गुलाबाची मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते.व्हॅलेंटाईन डे ला तर गुलाबाला उचांकी दर मिळत असतो . गुलकंद,अत्तर ,गुलाबजल यासाठी देखील गुलाबाच्या फुलांची वापर होत असतो.जगभरात होणाऱ्या फुलांच्या उलाढालीमध्ये एकट्या गुलाबाचा वाटा ३५ ते ४० टक्के आहे. गुलाब फुलांची शेती हा शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय असू शकतो अशी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कृषी सहाय्यक श्रीमती आशा भूकन यांनी शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली व त्याचे फायदे शेतकऱ्यांना समजून सांगितले. या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात गावातील प्रगतशिल शेतकरी नवनाथ वाघुले, शैलेश वाघुले, अक्षय खाकाळ, अमोल धाडगे, गजाभाऊ राऊत , राहुल गोरे, परशुराम शिरोळे, श्रीराम सोनवणे, प्रवीण कण्हेरकर , बाजीराव शिंदे अमोल वाघुले आदि शेतकरी उपस्थित होते तर या शेतकरी कृषी प्रशिक्षण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर सरडे, प्रकल्प समन्वयक यांनी केले तर आभार श्री योगेश मिरपगार, कृषी तज्ञ (वनराई) यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!